महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      EVM जिवंत आहे की मेलं? पंतप्रधान मोदींचा विरोधकांना खोचक सवाल

      Shubham Tagad by Shubham Tagad
      June 7, 2024
      in राजकारण
      0
      EVM जिवंत आहे की मेलं? पंतप्रधान मोदींचा विरोधकांना खोचक सवाल
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      ईव्हीएम मशीन जिवंत आहे की मेलं? असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावलाय. सतत EVM विरोधात टीका करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला निकालानंतर टाळं लागलं, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावलाय.

      एनडीएच्या बैठकीत एकमताने नेतेपदी निवड झाल्यानंतर येत्या 9 जून रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारेत. या शपथविधी सोहळ्यासाठी (Swearing in Ceremony) भाजपच्या (BJP) सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळतेय. याआधी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ईव्हीएम मशीन (EVM) जिवंत आहे की मेलं? असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावलाय. सतत EVM विरोधात टीका करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला निकालानंतर टाळं लागलं, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावलाय. भारताच्या लोकशाही आणि निवडणूक आयोगाची हीच ताकद आहे. आता पुढच्या पाच वर्षात ईव्हीएमविरोधात काहीही ऐकू येणार नाही, पण जेव्हा 2029 मध्ये निवडणुका होतील तेव्हा पुन्हा विरोधकांकडून पुन्हा हा प्रश्न उपस्थित केला जाईल.

      भारतीय लोकशाहीची ही ताकद असून यावेळच्या निकालांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना गप्प केलं आहे. इंडि आघाडीतील लोकं ईव्हीएम, आधारसारख्या तांत्रिक प्रगतीवर प्रश्न उपस्थित करतात तेव्हा असं वाटतं की ते गेल्या शतकातील आहेत, असा टोलाही पीएम मोदी यांनी लगावला आहे.

      देशाात 22 राज्यातील लोकांना एनडीएला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे. आमची ही युती भारताचा आत्मा आहे आणि खऱ्या अर्थाने ते भारताचं प्रतिबिंब आहे. एनडीएतील घटक पक्षांमधील विश्वासाचं नातं मजबूत आहे आणि अतुट आहे असंही पीएम मोदी यांनी म्हटलं आहे.

      पंतप्रधान म्हणाले की, देशात 10 राज्ये अशी आहेत जिथे आदिवासी समुदयाची संख्या प्रभावी आणि निर्णायक आहे. यापैकी सात राज्यांमध्ये एनडीएचं सरकार आहे. आम्ही सर्व धर्म आणि संविधानाच्या समानतेसाठी समर्पित आहोत. गोवा असो वा ईशान्य भारत, जिथे मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहतात. आज एनडीएला या राज्यांमध्येही सेवा करण्याची संधी मिळाली आहे. देशाच्या इतिहासात इतर कोणत्याही आघाडीला इतकं यश मिळालेले नाही असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

      भाजपची महत्त्वपूर्ण बैठक

      लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपची महत्त्वूपूर्ण बैठक होतेय. यात विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेतला जाण्याची शक्यताय. दरम्यान, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या NDAच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाचं पान मिळालं. या बैठकीत अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट मंचावर स्थान मिळालं. अजित पवार अमित शाह यांच्या उजव्या हाताला बसले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नितीश कुमारांच्या शेजारी बसले होते. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे या दोघांना मंचावर बसण्याचा मान मिळाला.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम