काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत पाहायला मिळाले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याची प्रकार घडला आहे.
प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या वक्त्यव्याचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. मात्र लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधानपरिषदेत चर्चा नको अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली. मात्र ते बोलत असताना प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे हात करुन याचा विरोध केला. त्यावेळी अंबादास दानवे यांना माझ्याकडे हात करायचा नाही, असं म्हणत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.
मला अजिबात पश्चाताप नाही- दानवे
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माझा तोल गेलेला नाही. माझ्याकडे कुणी बोट दाखवून बोलले तर मी बोट तोडणार. प्रसाद लाडसारखा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? लोकसभेतील राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत विधानपरिषदेत चर्चा करायला हवी का? अशी विचारणा मी विधानपरिषद सभापतींना केली. त्यांनी याबाबत उत्तर देणे अपेक्षित होते. प्रसाद लाड यांनी सभापतींशी बोलणे गरजेचे होते. माझ्याकडे हातवारे करून माझ्यासी बोलण्याची गरज नव्हती. मला माझ्या वक्तव्याचा अजिबात पश्चाताप नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी केली. माझा राजीनाम्याची मागणी करत आहे. मात्र माझा राजीनामा मागण्याची मागण्याचा अधिकार केवळ माझ्या पक्षप्रमुखांना आहे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.