आपण सर्वांनी मारजापूर ही वेब सिरीज बघितलीच असेल, ज्या प्रकारे मिरजापूर मध्ये राजकारणातून वाढलेल्या द्वेषा मुळे लोकांची गोळी झाडून हात्या केली जाते, तसाच काहीसा प्रकार आता बीड मध्ये सुद्धा घडला, एका सारपंच्याची शनिवारी रात्री हात्या करण्यात आली, आता हे प्रकरण नेमक काय आहे? या मागे कोणाचा हात आहे?
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडच्या परळीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. परळीमधील मरळवाडीच्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. आता याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते, बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे यांनी निवडणूक लढवली होती. मरळवाडी ग्रामपंचायतमध्ये आंधळे सरपंच झाले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. परळीमधील बँक कॉलनी परिसरात ही घटना घडलीय. पोलिसांनी आंधळेंचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलाय. आर्थिक देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याच ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आलेय. या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवल होत. त्या ठिकाणी बबन गित्ते यांनी पैसे आणलेस का? अस म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गित्ते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले. अस बोल्या जातंय.
गोळीबाराच्या घटनेनंतर रात्रीपासूनच परळीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे, आता ज्यांच्या वर गुन्हा दाखल झालाय ते बाबन गीते कोण आहेत ते बघूयात,
जेव्हा राष्ट्रवादीत फुट पडली आणि शरद पवारांनी दौरे सुरू केले. पहिली सभा नाशिकच्या येवल्यात झाली आणि दुसरी सभा धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये झाली. पण, या सभेत 1000 गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन केले ते एका पक्षात येणाऱ्या युवा नेत्याने, त्यांच नाव बबन गित्ते. त्यांच्या पत्नीने परळी पंचायत समीतीच सभापती भूषवलय. राष्ट्रवादीच्या कुठल्याच मोठ्या नेत्याचे आत्तापर्यंत एवढ मोठ शक्तीप्रदर्शन बीडमध्ये झाल नाही. या वरुण बीड मध्ये बाबन गीते यांची ताकद आणि लोकप्रियता किती आहे हे लक्षात येत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबन गित्ते वाढले. पंकजा यांच नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांबरोबर राजकारण केल. पण पुढे तीव्र मतभेद झाल्याने ते धनुभाऊंच्या सोबतीला गेले. त्यांच्या संगतीनेच गित्तेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही. बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या. पत्नी सभापती असली तरी बबनराव काही कामे स्वत: करायचे. यामुळे त्यांच्यावर विविध आरोप झाले. पुढे काम करण्यात त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या. धनुभाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला. तिथेच धनंजय मुंडे आणि गित्ते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर बबन गित्ते यांच्यावर अनेक आरोप झाले. पुढे एका प्रकरणात त्यांना जेलवारी करावी लागली. मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायचा, असा निर्धार गित्ते यांनी केला. जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली. धनंजय मुंडे अजितदादांच्या सोबतीला गेले. हीच संधी साधून शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गित्ते यांनी फिल्डिंग लावली. आमदार क्षीरसागर यांच्या मदतीने त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली अन् आपला राष्ट्रवादीतला प्रवेश केला. शरद पवार या निवडणुकीत परळीतुन त्यांना तिकीट देणार अशी चर्चा सुद्धा सुरू होती, पण या प्रकरणा नंतर चित्र काहीस वेगळ ठरू शकते, आता बाबन गीते यांच्या वरचा आरोप सिद्ध झालेला नाहीय, पण जर हा आरोप सिद्ध झाला तर बाबन गीते यांच्या अडचणी वाढतील