महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home मुंबई ठाणे

      ‘ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा’

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 4, 2024
      in ठाणे, महाराष्ट्र
      0
      ‘ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा’
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये सध्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.

      मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये सध्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘मुख्यमंत्र्यांचा जिल्हा..पालकमंत्री बेपत्ता’, ‘पालकमंत्री नाही थाऱ्यावर…जनतेला सोडलं वाऱ्यावर…’ तसेच, ‘ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा आणि 1 गावठी कोंबडा आणि वलगणीचे (चाढणीचे) मासे बक्षीस मिळवा.’ अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. सध्या या बॅनरची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे. 

      गेल्या अडीच वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुठेच फिरकले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे यांनी केला आहे. आरोप करीत त्यांनी शंभुराज देसाई यांच्या नावाची बॅनरबाजी केली आहे. सध्या हे बॅनर मुरबाडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      या बॅनरवर लिहिलं आहे, ‘साहेब आपला पत्ता कुठेच लागत नाही. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. जिथे कुठे असाल तिथून परत या, आम्ही तुमची वाट पाहतोय. आपल्या जिल्ह्यात असंख्या समस्या आहेत.’  पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासातले म्हणून ओळखले जातात. म्हणूनच साताऱ्यातील असूनही त्यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

      मुरबाड तालुक्यात आदिवासी भागातील रस्त्यांच्या समस्या, वैद्यकीय सुविधांचा अभाव यांसारख्या अनेक प्रश्नांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनांची कोंडी होत आहे. या महामार्गावरील वासिंद, खातिवली, आसनगाव या रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामं सुरू असल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याबाबत स्थानिकांकडूनही तक्रार करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप त्यावर उपययोजना करण्यात आलेली नाही. 

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम