महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      पापाचा घडा कोणाचा भरला? शिंदेंचे ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 7, 2024
      in राजकारण
      0
      पापाचा घडा कोणाचा भरला? शिंदेंचे ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. तो लपवण्यासाठी योजना आणल्या जात आहेत असा टोलाही ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

      नागपूर:

      उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शीव संवाद मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, भामटे असा उल्लेख ठाकरे यांनी केला. शिवाय यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. तो लपवण्यासाठी योजना आणल्या जात आहेत असा टोलाही ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      शिंदेंचे प्रत्युत्तर काय? 

      सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार आहे. त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. हीपापं लपवण्यासाठी त्यांनी योजना आणल्या आहेत. त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, ज्या काही जागा जिंकता आल्या त्या फक्त आणि फक्त धनुष्यबाणामुळे जिंकता आल्या. हा विजय तुमचा विजय नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पापाचा घडा कोणाचा भरला आहे हे जनता आता विधानसभा निवडणुकीत दाखवून देईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांनी अडीच वर्षात केलेली कामे आणि आम्ही दोन वर्षात केलेली कामांची तुलना केल्यावर कोणा सरस आहे हे समजेल असेही शिंदे म्हणाले. 

      ठाकरेंवर शिंदेंचा हल्लाबोल

      छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेहे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. यावरून शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष केले. जे कधी घराच्या गेट बाहेर येत नव्हते ते आता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. आम्ही बहीणांना रक्षाबंधनाची भेट दिली आहे. दर महिन्याला 1500 रूपये देणार आहोत. शिवाय तीन सिलेंडरही मोफत देणार आहोत. तुम्ही कधी कोणाला दिलं नाही. पण आमची देण्याची दानत आहे. ही योजना कायमस्वरूपी आहे असंही सांगायला ते विसरले नाहीत. 

      विधानसभेत परिणाम भोगावे लागतील 

      लोकसभेला कोणाच्या मतांवर जिंकला हे सर्वांना माहित आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून अभद्र युती तुम्ही केली. त्याची प्रचेती आता विधानसभेला येतील. केलेल्या चुकीचे परिणाम भोगावे लागतील असेही ते म्हणाले. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं हे किती दिवस रडत बसणार आहात. लोकसभा निवडणुकीत आमचाच स्ट्राईक रेट जास्त आहे असा दावाही शिंदे यांनी केला. समोर समोर झालेल्या लढतीत आपलेच उमेदवार विजयी झाल्याचे ते म्हणाले.  

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम