महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, कसं असेल त्यांचं मंत्रिमंडळ?

      Shubham Tagad by Shubham Tagad
      June 12, 2024
      in राजकारण
      0
      चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, कसं असेल त्यांचं मंत्रिमंडळ?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      नायडू विजयवाडाच्या उपनगरीय भागातील गन्नवरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये सकाळी 11.27 मिनिटांनी शपथ घेतील.

      नवी दिल्ली:

      तेलुगू देसमचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. नायडू विजयवाडाच्या उपनगरीय भागातील गन्नवरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये सकाळी 11.27 मिनिटांनी शपथ घेतील. मंगळवारी तेलुगू देसमच्या आमदारांनी आणि एनडीए  मित्रपक्षांनी नायडूंची आपला नेता म्हणून निवड केली आहे. या शपथविधीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य नेते आणि सेलिब्रिटीदेखील सामील होतील. पीएम मोदी आधी आंध्रप्रदेशात जातील, त्यानंतर ओडिशाला जाणार आहेत. ओडिशात पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन झालं असून येथील शपथविधीला पीएम उपस्थित राहतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील विजयवाडामध्ये आंध्रप्रदेशातील मनोनित मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंच्या शपथविधी सोहळ्यात सामील होतील. 

      विधानसभा निवडणुकीत किती जागांवर विजय
      विधानसभा निवडणुकीत नायडूंच्या नेतृत्वात एनडीए सरकारने 175 पैकी  164 जागांवर विजय मिळवला. 

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      आंध्रप्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळं झाल्यानंतर अजूनही येथे राजधानीवरुन वाद सुरू आहे.  यामध्ये तीन राजधानींचा उल्लेख केला जातो. मात्र आता तेलुगू देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडू यांनी केवळ एक राजधानी ठेवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी त्यांनी सांगितल्यानुसार, अमरावती ही एकमेव राजधानी असेल.  

      कसं असेल चंद्राबाबूंचं मंत्रीमंडळ?

      चंद्राबाबू हे मुख्यमंत्री तर पवन कल्याण हा उपमुख्यमंत्री असणार आहेत. पवन कल्याणकडे उपमुख्यमंत्रीपदासह महत्वाची खाती दिली जाणार असल्याची माहिती आहे. पवन कल्याणकडे 3 कॅबिनेट मंत्रिपदं तर भाजपला दोन कॅबिनेटची शक्यता आहे. टीडीपीला 20 मंत्रीपदाची शक्यता, जास्तीत जास्त मागासवर्गीय नेत्यांना संधीची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडूंचा मुलगा नारा लोकेशही मंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम