महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      Narendra Modi on Congress : 2014 नंतरचा भारत घरात घुसून मारतो, आधीचं सरकार गप्प राहायचं ; पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 2, 2024
      in राजकारण
      0
      भाषण सुरु असतानाच बसले मोदी, राहुल गांधींवर भडकले अध्यक्ष! नेमकं काय झालं?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      Narendra Modi on Congress : “दहशतवादी 2014 च्या पूर्वी वाटेल तेव्हा आणि वाटेल तिथे हल्ला करु शकत होते. 2014 च्या पूर्वी निर्दोष लोक मारले जात होते. भारतातील कानाकोपऱ्याला टार्गेट केले जात होते. तेव्हाचे सरकार गपचूप बसायचे. तोंड सुद्धा उघडत नव्हते.”

      Narendra Modi on Congress : “दहशतवादी 2014 च्या पूर्वी वाटेल तेव्हा आणि वाटेल तिथे हल्ला करु शकत होते. 2014 च्या पूर्वी निर्दोष लोक मारले जात होते. भारतातील कानाकोपऱ्याला टार्गेट केले जात होते. तेव्हाचे सरकार गपचूप बसायचे. तोंड सुद्धा उघडत नव्हते. 2014 नंतरचा भारत घरात घुसून मारतो. आताचा भारत सर्जिकल स्ट्राईक करतो, एअर स्ट्राईक करतो. दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचे सामर्थ्यही भारताने दाखवले आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. ते लोकसभेत बोलत होते. नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 

      संविधान डोक्यावर ठेऊन नाचणारे लोक जम्मू काश्मीरमध्ये संविधान  लागू करण्याचे धैर्य दाखवत नव्हते

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता देशातील प्रत्येक नागरिक जाणतो की, आपल्या सुरक्षेसाठी भारत काहीही करु शकतो. आर्टिकल 370 व्होट बँकेचे शस्त्र बनवण्यात आले. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमधील लोकांचे अधिकार गेले होते. भारताचे संविधान जम्मू-काश्मीरच्या सीमेमध्ये प्रवेश करु शकत नव्हते. हे संविधान डोक्यावर ठेऊन नाचणारे लोक जम्मू काश्मीरमध्ये संविधान  लागू करण्याचे धैर्य दाखवत नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत होते. कलम 370 चा काळ होता,तेव्हा सीमेवर दगड मारण्यात येत होते. हे लोक निराशेत जात म्हणायचे आता जम्मू -काश्मीरचे आता काहीही होऊ शकणार नाही. आता आर्टिकल 370 ची भिंत कोसळली आहे. 

      आम्ही तुष्टीकरण नाही,तर संतुष्टीकरण करतो, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल 

      पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, लोकशाही मजबूत आहे. भारताच्या संविधानावर विश्वास टाकत आणि भारताच्या तिरंग्यावर विश्वास टाकत लोकांनी मतदान केले. 140 कोटी देशवासियांमध्ये विश्वास निर्माण झाला. आम्ही तुष्टीकरण नाही,तर संतुष्टीकरण करतो. आम्ही खरी धर्मनिरपेक्षता देशाला दाखवली आहे. आमच्या निष्ठेवर देशातील जनतेने विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत आम्ही जनतेमध्ये मोठा संकल्प घेऊन गेलो, आशीर्वाद मागण्यासाठी गेलो होतो. विकसित भारतासाठी आम्ही आशीर्वाद मागितला होता. जनतेने विकसित भारताच्या संकल्पाला पाठिंबा देत विजयी केले. आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम