रात्री आठ-साडे आठची वेळ दिवसभर काम करून थकलेली काही माणसं आपलं जेवण करून घराबाहेर बसलेली.. काही जन कामाच्या तर काही जन मराठा ओबीसी समाजाच्या आरक्षणावर चर्चा करत होते. अशा मध्येच गावातून जाणाऱ्या हायवेवरून एक जमाव जात होता, त्यातले काही तरुण घोषणाबाजी होते, डीजेवर गाणी वाजवली जात होती. गावातले काही माणसं त्यांना म्हणतात की डीजे जरा बाजूला घ्या किंवा पुढे घ्या रस्त्यात नको.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बस हेच वाक्य महाराष्ट्राच्या जातीय राजकारणात भूकंप आणणारं ठरलं, हेच वाक्य अनेक समाज बांधवांच्या मनामध्ये द्वेष पसरवण्यासाठी पूरक ठरलं. या एका वाक्याला काही दारू पिलेल्या युवकांनी चुकीच्या पद्धतीने घेतलं आणि बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे रूपांतर जातीय शिव्यागाळात व्हायला लागलं. पाहता पाहता एक जमाव दगडफेक करायला लागला. ही दगडफेक दुसऱ्या जमावाने परतून लावण्यासाठी त्यांनीही दगडफेक सुरू केली आणि महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये मातोरी हे गाव चर्चेत आलं. मातोरी गाव म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं गाव.. आता हे सगळं चुकीच्या योगायोगाने झालं की जरांगे पाटील यांच्यावर राग होता म्हणून झालं, की हाके यांच्यावर असलेल्या रागातून झालं की मग या पाठीमाग दुसरं काही राजकीय गणित होतं ते सगळ या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.. ओबीसी समाजासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा होता. पण त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी म्हणजेच मातेरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मातोरी मध्ये पोलीस दाखल झाले. पण अशा स्थितीत देखील मातेरीच्या दोन्ही बाजूला म्हणजे बीड आणि नगर या दोन्ही दिशेच्या बाजूने रास्तारोको रात्रभर सुरू होतं. साहजिकच यानंतर या गावाला छावनीचं स्वरूप आल्याचं बोलल्या जातंय. आता कधी बीडच्या राजकारणात इतकी मोठी हालचाल होईल, जातीय समीकरणावर निवडणुका होतील, निवडणुका झाल्यानंतरही अनेकांच्या मनात द्वेषात्मक भावना कायम राहील असा विचारही कोणाच्या मनात आला नसेल. कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्या कर्तृत्वातून निर्माण केलेलं आपलं अस्तित्व हीच बीडची ओळख झाली आणि अजूनही ती कायमहे. अर्थात लोकसभेच्या समीकरणात अपेक्षित घटना घडल्या, निर्णय लागला, राजकीय लढाई संपली. पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये समज-गैरसमज मात्र वाढतच चाललेत. विशेष म्हणजे जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ यायल्या लागल्यात तसा तसा हा वणवा जास्तीचा भडका घेतोय असं बोलल्या जातंय. पण या सगळ्यांमध्ये तरुणाई वाहत जातेय हे हल्ली स्पष्ट दिसायला लागलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या गावातून लक्ष्मण हाके यांचा ताफा भगवानगडाकडे जाणार होता. त्याच्या अगोदरच ही घटना झाली. आता काही ठिकाणी याचा संदर्भ लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांची केलाय असा लावला जातोय तर काही ठिकाणी हा हल्ला विरोध म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केलेला असू शकतो असं बोलल्या जातंय. दोन्ही गट, दोघांचे समर्थक आपापली भूमिका व्यक्त करत असले तरी यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निश्चितच उभा राहतो आणि तीच सगळ्यात मोठी चिंतेची बागच म्हणावी लागेल. एकीकडे ओबीसीच्या चेहरा असणारे धनंजय मुंडे कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी अशी भूमिका मांडत आहेत तर दुसरीकडे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेही बीडच्या जनतेला शांततेच आवाहन करत आहेत. मग प्रश्न हा निर्माण होतो की हरलेलेही शांततेचा आव्हान करत आहेत, तर दुसरीकडे जिंकलेलेही शांततेच आव्हान करत आहेत. मग यामध्ये असंतोशाच वातावरण निर्माण कोण करतंय, हा सगळ्यात मोठा प्रश्नहे. एक सजग नागरिक म्हणून आपल्यातला बंधुभाव कायम ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घेणं गरजेच आहे.