महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक ? नेमकं प्रकरण काय ?

      Shubham Tagad by Shubham Tagad
      June 28, 2024
      in राजकारण
      0
      जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक ? नेमकं प्रकरण काय ?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या मूळगावी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.

      रात्री आठ-साडे आठची वेळ दिवसभर काम करून थकलेली काही माणसं आपलं जेवण करून घराबाहेर बसलेली.. काही जन कामाच्या तर काही जन मराठा ओबीसी समाजाच्या आरक्षणावर चर्चा करत होते. अशा मध्येच गावातून जाणाऱ्या हायवेवरून एक जमाव जात होता, त्यातले काही तरुण घोषणाबाजी होते, डीजेवर गाणी वाजवली जात होती. गावातले काही माणसं त्यांना म्हणतात की डीजे जरा बाजूला घ्या किंवा पुढे घ्या रस्त्यात नको.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      बस हेच वाक्य महाराष्ट्राच्या जातीय राजकारणात भूकंप आणणारं ठरलं, हेच वाक्य अनेक समाज बांधवांच्या मनामध्ये द्वेष पसरवण्यासाठी पूरक ठरलं. या एका वाक्याला काही दारू पिलेल्या युवकांनी चुकीच्या पद्धतीने घेतलं आणि बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे रूपांतर जातीय शिव्यागाळात व्हायला लागलं. पाहता पाहता एक जमाव दगडफेक करायला लागला. ही दगडफेक दुसऱ्या जमावाने परतून लावण्यासाठी त्यांनीही दगडफेक सुरू केली आणि महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये मातोरी हे गाव चर्चेत आलं. मातोरी गाव म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं गाव.. आता हे सगळं चुकीच्या योगायोगाने झालं की जरांगे पाटील यांच्यावर राग होता म्हणून झालं, की हाके यांच्यावर असलेल्या रागातून झालं की मग या पाठीमाग दुसरं काही राजकीय गणित होतं ते सगळ या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.. ओबीसी समाजासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा होता. पण त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी म्हणजेच मातेरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मातोरी मध्ये पोलीस दाखल झाले. पण अशा स्थितीत देखील मातेरीच्या दोन्ही बाजूला म्हणजे बीड आणि नगर या दोन्ही दिशेच्या बाजूने रास्तारोको रात्रभर सुरू होतं. साहजिकच यानंतर या गावाला छावनीचं स्वरूप आल्याचं बोलल्या जातंय. आता कधी बीडच्या राजकारणात इतकी मोठी हालचाल होईल, जातीय समीकरणावर निवडणुका होतील, निवडणुका झाल्यानंतरही अनेकांच्या मनात द्वेषात्मक भावना कायम राहील असा विचारही कोणाच्या मनात आला नसेल. कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्या कर्तृत्वातून निर्माण केलेलं आपलं अस्तित्व हीच बीडची ओळख झाली आणि अजूनही ती कायमहे. अर्थात लोकसभेच्या समीकरणात अपेक्षित घटना घडल्या, निर्णय लागला, राजकीय लढाई संपली. पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये समज-गैरसमज मात्र वाढतच चाललेत. विशेष म्हणजे जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ यायल्या लागल्यात तसा तसा हा वणवा जास्तीचा भडका घेतोय असं बोलल्या जातंय. पण या सगळ्यांमध्ये तरुणाई वाहत जातेय हे हल्ली स्पष्ट दिसायला लागलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या गावातून लक्ष्मण हाके यांचा ताफा भगवानगडाकडे जाणार होता. त्याच्या अगोदरच ही घटना झाली. आता काही ठिकाणी याचा संदर्भ लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांची केलाय असा लावला जातोय तर काही ठिकाणी हा हल्ला विरोध म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केलेला असू शकतो असं बोलल्या जातंय. दोन्ही गट, दोघांचे समर्थक आपापली भूमिका व्यक्त करत असले तरी यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निश्चितच उभा राहतो आणि तीच सगळ्यात मोठी चिंतेची बागच म्हणावी लागेल. एकीकडे ओबीसीच्या चेहरा असणारे धनंजय मुंडे कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी अशी भूमिका मांडत आहेत तर दुसरीकडे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेही बीडच्या जनतेला शांततेच आवाहन करत आहेत. मग प्रश्न हा निर्माण होतो की हरलेलेही शांततेचा आव्हान करत आहेत, तर दुसरीकडे जिंकलेलेही शांततेच आव्हान करत आहेत. मग यामध्ये असंतोशाच वातावरण निर्माण कोण करतंय, हा सगळ्यात मोठा प्रश्नहे. एक सजग नागरिक म्हणून आपल्यातला बंधुभाव कायम ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घेणं गरजेच आहे.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम