महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home महाराष्ट्र

      Monsoon Session: “…तो गाजर संकल्प असणार आहे”; उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला धरलं धारेवर

      Shubham Tagad by Shubham Tagad
      June 27, 2024
      in महाराष्ट्र
      0
      Monsoon Session: “…तो गाजर संकल्प असणार आहे”; उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला धरलं धारेवर
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महायुती सरकारलं धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

      Uddhav Thackeray Press Conference : पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महायुती सरकारलं धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे. कदाचित उद्याच त्याबद्दल घोषणा होतील. साधारणत: प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि राज्यात अर्थसंकल्प सादर केला जातो. त्या अर्थसंकल्पाच्या अनुषगांने त्या योजना किंवा घोषणा त्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली असते. उद्या घोषणांचा जो काही पाऊस पडेल तो गाजर संकल्प असणार आहे. कारण निधी खर्चच होणार नाही. घोषणा आजपर्यंत खूप झाल्या. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो, असं यापूर्वीही मी म्हटलं आहे. या सरकारला थोड्या जरी संवेदना असतील, तर त्या घोषणांची पूर्तता किती झाली, हे त्यांनी खरेपणाने सांगावं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, या सरकारला खोटं सरकार म्हणतातच. हे दोन्ही सरकार महागळती सरकार आहे. हे लिकेज सरकार आहेत. ह्यांना लाज लज्जा काही नाही. आम्ही काही प्रश्न विचारल्यावर ते आमच्यावर आरोप करतात. संपूर्ण अधिवेशनात महाराष्ट्राच्या जनतेचं प्रश्न उपस्थित केले जातील. राज्यातील शेतकरी ही परिस्थिती भोगत आहेत. सरासरी पाहिलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करतोय. घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं, तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की, राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.

      राज्यात काय देशात असा शेतकरी नसेल, जो हेलिकॉप्टरने शेतात जातो आणि पंचतारांकीत शेती करतो. विशेषत: अमावस्या पोर्णिमेला वेगळं पीक काढतात, असं माझ्या कानावर आलं आहे. शेतकऱ्याची हालत गंभीर झाली आहे. पावसाने ओढ दिली आहे. पाऊस म्हणावा तसा सुरु झालेला नाही. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये आजसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही.

      जवळपास सव्वा सहा हजार आत्महत्या या दोन वर्षात झाल्या आहेत. साधारणत: रोज ९ शेतकरी आत्महत्या करत आहेत. विदर्भाती, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा वाली कुणी राहिला नाही. हा गाजर संकल्प आहे. गाजरं दाखवा आणि पुढे चला. आता ते चालणार नाही. आजपर्यंत यांनी ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी किती झाली, त्याची एक श्वेतपत्रिका काढा. पण मला खात्री आहे, ती श्वेतपत्रिका एक नुसता कागद असेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम