सुर्वतीला आपण अश्वत्थामाची गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया, पौराणिक कथेनुसार अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र असून गुरु द्रोणाचार्य महाभारताच्या युद्धात कौरवांच्या वतीने लढत होते. युद्धादरम्यान पांडवांनी अश्वत्थामा मरण पावल्याची खोटी अफवा पसरवली. हे ऐकून गुरु द्रोणाचार्य दुखी झाले आणि संधी मिळताच पांडवांनी त्यांचा वध केला. जेव्हा अश्वत्थामाला हे कळाल तेव्हा त्याने कपटाने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पांडवपुत्रांची हत्या केली. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला, की जो पर्यन्त चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यन्त तू पृथ्वीवर भटकत राहशील आणि तुझ्या शरीरावर अशा जखमा असतील ज्या कधीही भरून येणार नाहीत. या शापामुळे कलियुगातही अश्वत्थामा भटकत असतो आणि त्याच्या शरीरातून रक्ताचा वास येत असतो, अस म्हणतात. पण खरंच तो हा शाप भोगतोय का? की पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही फक्त एक दंत कथाए, आता या वर इतिहासकारांच काय म्हणण आहे आणि आश्वाथामाचा लेखी स्वरूपात उल्लेख कुठे आढळतो ते बघूया, आजवर भारतातल्या अनेक भागात अश्वथामाला बघितल्याच अनेक लोकांनी म्हटलंय, पण त्यांच्या कडे काही ठोस पुरावे असल्याच आपल्याला दिसत नाही, हा! पण यात काही लोक असे सुद्धा ज्यांनी अश्वथामाला बघितलय, त्या लोकांचे नावं एकूण तुमच्या भुवया उंचावतील, आश्वाथामा बद्दल सांगितली जाणारी पहिली आख्यायिका अशी आहे की मोहोममद घोरीन जेव्हा पृथ्वीराज चव्हाणला युद्धात हरवल होत तेव्हा हा पराभव पृथ्वीराज चव्हाणच्या जिव्हारी लागला होता आणि ते जंगलात निघून गेल्या वर त्याला तिथे एक साधू भेटला, ज्याच्या कपाळावर एक जखम होती, पृथ्वीराज चव्हाण हे चांगले वैद्य होते, त्यांनी त्या साधूची मदत करायच ठरवल, 8 दिवस चव्हाण ने त्या साधूवर उपचार केला, पण जखम काही बारी झालीच नाही, चव्हाणला सौशय आला, हा अश्वथामा तर नाही ना? हिम्मत करत त्यानं “तुम्ही अश्वथामा तर नाही ना ? हे विचारल त्या प्रश्नावर तो साधू फक्त होकार्थी हसला, आठ दिवस निस्वार्थी भावान उपचार केल्या बद्दल त्यान चव्हाणला शब्द भेदी बाणांची विद्या शिकवली, पुढे हीच विद्या वापरुन त्यान मोहिम्मद गोरीला ठार केल अस बोलल्या जात, पृथ्वीराज चव्हाणच्या दरबारात असणाऱ्या चांद बरदाई यान त्यांच्या जीवणावरती ब्रज भाषेत एक पृथ्वीराज रासो म्हणून जे काव्य लिहिल त्यात याचा उल्लेख आढळतो, त्या नंतर 300 वर्ष अश्वथामाचा उल्लेख कुठेच आढळत नाही, पण 15 व्या शतकात तो पुन्हा एका व्यक्तिला भेटला, त्याच नाव होत कुमार व्यास, कुमार व्यासने लिहिलेला महाभारतावर आधारित कथामंजिरी हा काव्य संग्रह खुद्द अश्वथामा ने त्यांना सांगितला आहे असं म्हंटल्या जात, त्यानंतर अश्वथामाची लिखित स्वरूपात नोंद आहे ती 200 वर्षांपूर्वी, शतानंद स्वामींनी लिहिलेल्या सत्संगी जीवन या स्वामी नारायण यांच्या आत्मचरित्रात, स्वामी नारायण हे स्वामी नारायण संप्रदयाचे संस्थापक आहेत, आणि त्यांना विष्णूचा अवतार समजल्या जायच असं काही जण सांगतात, त्याचं स्वामी नारायणांना अश्वथामा न दिलेल्या शापाची ही तिसरी आख्यायिका, या व्यतिरिक्त आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, एका ठिकाणी अश्वथामा ची यात्राही भरते, कपाळावरची जखम घेऊन जेव्हा तो शापित अवस्थेत हिंडत होता तेव्हा आदिवासी राजा पांठा ठाकर न त्याला सातपुडा डोंगरांवर राहण्याची विनंती केली, आणि तेव्हा पासूनच तो डोंगर अस्थंबा ऋषि चा डोंगर म्हणून ओळखू जाऊ लागला, दर धान्यत्रयोदशीला आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात, हा डोंगर चढण्यासाठी अतिशय कठीण आहे, तरीही ते न चुकता ही यात्रा पार पाडतात, पण फक्त पुरुषच! कारण अश्वथामा ब्रम्हचारी होता, म्हणून स्त्रिया या यात्रेत सहभागी होत नाही, डोंगराच्या टोकाला जायला 2 दिवस लागतात, त्या टोकाला एक देव दरवाजाए, तिथे कान लावून ऐकलं की कर-कर असा आवाज येतो, तिथे अश्वथामा सोन्याच्या बंगळीवर झुलतो अस तिथले पुजारी सांगतात, यात्रेत वाट चुकलेल्यांना तो डोंगराच्या पायथ्याशी आणून सोडतो असंही सांगतात, महाभारताने त्याच किती ही कुरूप चरित्र रंगवल असलं तरीही सटपुड्याच्या आदिवासी साठी तो देवच आहे, नर्मदा परिक्रमेला निघालेल्या कित्तेक वाटसरूंना तो रास्ता दाखवतो, तो आपल्या जखमेवर लावण्यासाठी कोणाला तेल मगतो, कोणाला हळद तर कोणाला दही, अश्याही आख्यायिका इथे प्रसिद्ध आहे पण आज पर्यन्त त्याला कोणीच तंत्रज्ञानाच्या व्याख्येत कैद करू शकल नाही, म्हणून आज अश्वथामा अनेक भारतीयांसाठी एक न सुटणारं कोड ठरलं, आता अश्वथामाच्या अस्तित्वा बद्दल तुमचं मत काय आहे .. .. ..